Mahavikas Aghadi I ‘भाजप हटवा, भ्रष्टाचार मिटवा’, ‘महायुती सरकारचे एकच मिशन प्रत्येक कंत्राटात 30 टक्के कमिशन’, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष आक्रमक
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीची निदर्शने मुंबई – महायुती सरकारच्या काळात भ्रष्टाचार वाढला आहे. सत्ताधारी आमदार ते मंत्री सर्वांची दलालांसोबतची मैत्री लपून राहिलेली नाही. स्वतःचे खिसे भरण्याकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष असून सर्वसामान्यांच्या समस्यांचे त्यांना काहीही देणेघेणे नाही. याचा निषेध म्हणून पावसाळी अधिवेशनाच्या बाराव्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधी पक्ष आक्रमक झाला. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत…