दोन सख्ख्या बहिणींची मुंबई पोलीस दलात निवड । चिंचवली गावात मोठा जल्लोष | Nilesh Sambare

जिजाऊ मोफत UPSC/MPSC वाचनालय व मोफत पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, वासिंदच्या विद्यार्थिनी असलेल्या सख्ख्या बहिणी कु. शैला संतोष घोडविंदे आणि कु. चित्रा संतोष घोडविंदे यांची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल चिंचवली ग्रामस्थांच्या वतीने आयोजित भव्य नागरी सत्कार सोहळा व मिरवणुकीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहे. या कार्यक्रमास चिंचवली ग्रामस्थ, […]

तुकाराम मुंडे यांच्यासारखे अधिकारी घडविण्याचा माझा संकल्प – निलेश सांबरे | Tukaram Mundhe | Nilesh Sambare | Jijau |

शहापूर तालुक्यातील रातांधळे येथील मयुरी बळीराम कलचिडा हिची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिच्या या यशानिमित्त आज गावातून भव्य रॅली काढण्यात आली. रातांधळे गावाच्या वेशीपासूनच या मिरवणुकीला सुरुवात झाली होती. नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत तिचे जंगी स्वागत केले. त्यानंतर आयोजित सत्कार समारंभात जिजाऊ […]

Thane | मुरबाडच्या ग्रामीण भागातून घडले ११ शासकीय अधिकारी; जिजाऊ संस्थेच्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा

सोनावले, ता. मुरबाड, जि. ठाणे येथे जिजाऊ मोफत MPSC/UPSC वाचनालय व मोफत पोलीस अकॅडमी, घसई यांच्या माध्यमातून शासकीय सेवेत निवड झालेल्या ११ यशस्वी विद्यार्थ्यांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांच्या प्रमुख उपस्थित होते. मुंबई पोलीस, फायर ब्रिगेड, BMC तसेच विविध शासकीय […]

ऐतिहासिक कामगिरीबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांचा विशेष गौरव

खंडाळा : अभियांत्रिकी क्षेत्रात महाराष्ट्राने पुन्हा एकदा जागतिक पातळीवर आपली छाप उमटवली असून “मिसिंग लिंक” या अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून जगातील सर्वात रुंद बोगदा निर्माण करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविण्याचा मान मिळाला आहे. या अभूतपूर्व यशामागे एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि अभियांत्रिकी कौशल्य निर्णायक ठरले आहे.   […]

अभियांत्रिकीचा दीपस्तंभ ठरलेले डॉ. अनिलकुमार गायकवाड : पुण्यात भव्य सोहळ्यात जीवनप्रवासावरील ग्रंथाचे प्रकाशन I Anilkumar Gaikwad I MSRDC I

(लेवांशी ग्रुपचा उपक्रम; प्रा. डॉ. अॅड. सुनील बळीराम गायकवाड लिखित ग्रंथाचे शेरेटोन ग्रँडमध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन – भीमालया आयुर्वेद व तकक्षवी परफ्यूमचेही लाँचिंग) पुणे (विशेष प्रतिनिधी) – अभियांत्रिकी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून राज्याच्या पायाभूत सुविधा विकासात मोलाचे योगदान देणारे एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक इंजि. डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांच्या जीवनप्रवासावर आधारित “अभियांत्रिकीचा दीपस्तंभ : […]

शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा करार – ॲड. श्रीनिवास बिक्कड

भारत-अमेरिका व्यापार करार हा केवळ आर्थिक दस्तावेज नाही; तो ग्रामीण भारताच्या भवितव्याशी जोडलेला आहे. शेतकऱ्यांना कायद्याने हमीभावाची गॅरंटी दिली जात नाही, तोपर्यंत हा करार गंभीर धोका मानला जाईल. रत-अमेरिका व्यापार कराराच्या घोषणेनंतर केंद्र सरकारने त्याला ‘ऐतिहासिक’, ‘रणनीतिक’ आणि ‘दोन्ही देशांसाठी फायदेशीर’ असे विशेषण लावले. परंतु या कराराचा अधिकृत मजकूर अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. संसदेला […]

तुकाराम मुंडे निवडणूक आयोगाचे अध्यक्ष झाले तर… लोकशाहीचा खरा कस लागेल!

प्रवीण बागड़े नागपूर , मो.क्र. ९९२३६२०९१९ भारतीय लोकशाही ही केवळ मतपेटीपुरती मर्यादित नसून ती मूल्यांवर उभी असलेली व्यवस्था आहे, असे आपण अभिमानाने सांगतो. मात्र वास्तवात हीच लोकशाही आज अनेक प्रश्नांनी ग्रासलेली दिसते. निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव मानला जातो, पण अलीकडच्या काळात हा उत्सव कमी आणि तमाशा अधिक झाला आहे. पैशांची उधळण, जाती-धर्माचे ध्रुवीकरण, सत्तेचा गैरवापर, […]

उन्नाव बलात्कार प्रकरणी मुंबई युवक काँग्रेसचे लोकल ट्रेनमध्ये जनजागृती आंदोलन

‘बेटी बचाओ’ ही भाजपाची पोकळ घोषणा, बेटीवर अन्याय करणाऱ्यांच्या पाठीशी भाजपा उभा मुंबई : उन्नाव बलात्कार प्रकरणातील आरोपी, भाजप आमदार कुलदीप सेंगरची शिक्षा न्यायालयाने निलंबित केल्याचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे. उन्नावसारख्या प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्याऐवजी आरोपीला दिलासा देणारी व्यवस्था भाजपच्या मानसिकतेचे प्रतीक आहे. ‘बेटी बचाओ’ ही केवळ घोषणा असून प्रत्यक्षात भाजप बेटीवर अन्याय […]

BMC Election 2026: मुंबई महापालिकेवर कोणाचा झेंडा? निवडणूक इतिहास, वॉर्ड, आरक्षण ते 2017 निकाल

मुंबई | लोकशासन न्यूज मुंबई महानगरपालिकेची (BMC – Brihanmumbai Municipal Corporation) निवडणूक म्हणजे केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक नाही, तर ती देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेची सत्तास्पर्धा आहे. सुमारे ₹50,000 कोटींहून अधिक वार्षिक बजेट, शहराचा कारभार, पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणीपुरवठा आणि ड्रेनेज व्यवस्था यामुळे BMC निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची मानली जाते. BMC Election 2026 […]

शेतकऱ्यांचा पहिला सेनापती आणि अपूर्ण राहिलेली कृषिक्रांती : डॉ. पंजाबराव देशमुख

प्रविण बागडे, नागपूर, भ्रमणध्वनी : 9923620919 भारतीय लोकशाहीच्या पहाटेच्या काळात, जेव्हा स्वातंत्र्याचा अर्थ केवळ राजकीय मुक्तता एवढाच मर्यादित होता, तेव्हा पंजाबराव देशमुख यांनी त्या स्वातंत्र्याला शेतकऱ्यांच्या शेतात, त्यांच्या कष्टात आणि त्यांच्या हक्कांत उतरवण्याचा ध्यास घेतला. भारतीय स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात अनेक मंत्री झाले, अनेक धोरणे आली; मात्र शेतकऱ्याच्या वेदनेला संसदेत नेऊन ती राष्ट्राची चिंता बनवणारा नेता विरळाच. […]