म्हसळा – सुशील यादव
तालुक्यातील जनतेला पिण्याचे मुबलक व शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी शासनाकडून जलजीवन योजने अंतर्गत शेकडो कोटी रुपये खर्च करूनही टंचाई पुर्व कालावधीत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाल्या नसल्याने नागरीकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
योजना कार्यान्वित करण्यात ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि संबंधीत ठेकेदारांकडून नियोजनाचा अभाव आणि हलगर्जीपणा होत असल्याचे ग्रामस्थानी तक्रार अर्ज करून,दैनिक वृत्तपत्रात छापून निदर्शनास आणून दिले असता यावर कायम उपाय योजना व्हावी या उद्देशाने म्हसळा तालुका पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पत्रकारांनी पुढाकार घेतला आहे.
शासकीय अधिकाऱ्यांकडे चर्चा करून तो सोडविण्यासाठी संयुक्तं बैठक घेऊन समन्वय साधला आहे.म्हसळा शासकीय विश्रामगृह येथे आयोजित केलेल्या बैठकीत तालुका तहसीलदार समीर घारे,पंचायत समिती गटविकास अधिकारी माधव जाधव,नगर पंचायत मुख्याधिकारी विठ्ठल राठोड,पाणी पुरवठा अभियंता यशवंत बागकर, माळी,जेष्ठ पत्रकार संजय खांबेटे,प्रेस क्लब अध्यक्ष बाबु शिर्के,सचिव महेश पवार, पत्रकार उदय कळस,अशोक काते,सुशिल यादव,श्रीकांत बीरवाडकर,अंकुश गाणेकर,वैभव कळस आणि पाणी पुरवठा कर्मचारी यांनी चर्चेत भाग घेतला होता.
