शहापूर तालुक्यातील रातांधळे येथील मयुरी बळीराम कलचिडा हिची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याने संपूर्ण गावात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिच्या या यशानिमित्त आज गावातून भव्य रॅली काढण्यात आली. रातांधळे गावाच्या वेशीपासूनच या मिरवणुकीला सुरुवात झाली होती. नागरिकांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत तिचे जंगी स्वागत केले. त्यानंतर आयोजित सत्कार समारंभात जिजाऊ […]
